Letest News
पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपट टीमचे श्री साईबाबा समाधी दर्शन शिवमहापुराण कथा –पोलिसांचे नियोजन फळास गर्दीचा फायदा घेणाऱ्या टोळ्यांवर धडक कारवाई-२६ आरोपींना अटक मिश्राला साईबाबांची एलर्जी महाराष्ट्र हि साईंची शिवांची आणि संतांची भूमी साईबाबा हे आमचे देवचं नाहीत... रेखा जरे हत्याकांडात मोठी घटना! — बाळबोठे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर कोपरगाव – करंजी शाळेत दाखले वाटप; नायब तहसीलदार सातपुते यांच्या उपस्थितीत उपक्रमाची प्रशंसा साईभक्त जितेंद्र उमेडी यांनी श्री साईबाबांच्या चरणी तांब्याची छत्री केली अर्पण आजचा दिवस शिर्डीकरांसह संपूर्ण साईभक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि भावनिक —श्री साईबाबा महासमाधी दिन गुन्हे प्रतिबंध आणि पुढील योजना-ऑपरेशन मुस्कान – पार्ट 2 : शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती अभियान निवडणूक आयोग हरिश्चंद्र नाही' उद्धव संतापले -मतदार यादी दुरुस्त करा- नंतरच निवडणुका राज ठाकरे-मतदार ... शिवसेनेच्या (ठाकरे गट) नवीन जिल्हा कार्यकारिणीने संगमनेर तालुक्यात उत्साहाचा नवा संचार
क्राईमशिर्डी

शिर्डी व परिसरात अतिवृष्टीचा कहर शहर जलमय पडझड व अडथळे प्रशासनाचा सततचा तळ ठोकून तपास

शिर्डी (प्रतिनिधी) : शिर्डी शहर व राहाता तालुक्यात शनिवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला. अवघ्या काही तासांतच शहरातील रस्ते, उपनगर, वस्ती जलमय झाल्या. ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक कोलमडून पडली. नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

विशेषतः शिर्डी मंदिर परिसर, कनकुरी रोड, नगर-मनमाड महामार्ग लगतच्या वसाहती या भागांत मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याचे चित्र दिसले.


🛑 दोन युवकांचा दुर्दैवी अपघात

शिर्डी-राहाता शिव परिसरातील हॉटेल फाऊंटन जवळील ओढा रात्री अचानक दुथडी भरून वाहू लागला. त्या दरम्यान दोन दुचाकीस्वार रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले.

बचाव पथकाने तातडीने मदतकार्य करत अक्षय घोडे या युवकाला सुखरूप वाचवले.मात्र त्याच्यासोबत असलेला रोहित खरात हा तरुण पाण्यात वाहून गेला असून, त्याचा शोधकार्य सुरू आहे. पोलीस, अग्निशमन दल व स्थानिक ग्रामस्थ त्यासाठी रात्रभर झटत आहेत.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.


🛑 शिर्डी शहर जलमयअतिवृष्टीमुळे शहरातील प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले. शिर्डी कनकुरी रोड पूर्णपणे बंद झालाउपनगरांमध्ये घरामध्ये पाणी शिरल्याने कुटुंबांना आपली जनावरे, संसारोपयोगी वस्तू वाचवण्यासाठी रात्रीभर धावपळ करावी लागली.काही ठिकाणी लहान मुले व वृद्धांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम प्रशासनाने केले.

फळफळावळ विक्रेते, छोटे दुकानदार यांचे मोठे नुकसान झाले असून, नागरिकांमध्ये रोष व भीतीचे वातावरण आहे.


🛑 पडझड व अडथळे

सुसाट वाऱ्याबरोबर झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक मोठी झाडे रस्त्यावर कोसळली शासकीय बॅरिकेटसह अनेक खाजगी जाहिरात फलक पाण्यामुळे वाऱ्यात उन्मळून पडले. काही ठिकाणी हे फलक थेट वाहनांवर आदळले.नगरपालिकेच्या पथकाला झाडे व फलक हटविण्यासाठी रात्रभर शर्थीचे प्रयत्न करावे लागले.


🛑 प्रशासनाचा सततचा तळ ठोकून तपास

घटनास्थळी तहसीलदार, पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, पीएसआय काळे, पीआय चव्हाण आदी वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहून बचाव कार्याचे मार्गदर्शन करत होते.आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलिस दल, अग्निशमन दल व स्थानिक स्वयंसेवक यांनी रात्रीभर शेकडो लोकांना सुरक्षित स्थळी हलवले.नागरिकांना सतत सूचना देत धोकादायक ठिकाणी जाण्यास मज्जाव करण

याशिवाय वीजपुरवठा खंडित झालेल्या भागात महावितरणचे अधिकारी रात्री उशिरापर्यंत काम करून सेवा पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करत होते.


🛑 शासकीय यंत्रणा सतर्क

संपूर्ण शहरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांना घराबाहेर पडू नये, ओढे-नाल्यांच्या जवळ जाणे टाळावे, अशी प्रशासनाची सूचना. आरोग्य विभागानेही पावसामुळे रोगराई पसरू नये म्हणून दवाखान्यांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.नगरपालिका, तहसील कार्यालय व पोलीस प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.


🛑 नागरिकांचा आक्रोश

या अतिवृष्टीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. छोट्या व्यवसायिकांचे दुकानातील माल खराब झाला, तर मजुरी करणाऱ्या वर्गाला उपजीविकेचे संकट निर्माण झाले आहे. काही कुटुंबांना मदतीची तातडीची गरज असून, नागरिक प्रशासनाकडे मदतीची मागणी करत आहेत.


🛑 पुढील उपाययोजना

हवामान खात्याने पुढील २४ तासांत जोरदार पावसाचा इशारा दिल्यामुळे प्रशासन हायअलर्टवर आहे. शिर्डीमध्ये मदत केंद्र स्थापन करण्यात आले असून, आपत्ती व्यवस्थापन पथक सतत कार्यरत आहे. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत बचाव पथके सज्ज ठेवली गेली आहेत.


👉 एकूणच, शिर्डी व परिसरात झालेल्या अतिवृष्टीने सामान्य जनजीवन विस्कळीत झाले असून, प्रशासन व मदत पथक नागरिकांच्या मदतीसाठी रात्रंदिवस कार्यरत आहे.


मंत्रालयीन स्तरावरील राज्य स्तरीय आपत्कालीन कार्यकेंद्रातील संबंधित अधिकारी यांचेशी संपर्क साधण्यासाठी प्रस्तुत कार्यकेंद्रामध्ये २४x७ अधिकारी/कर्मचारी उपलब्ध असुन संपर्क क्र. खालीलप्रमाणे आहेत.

अहिल्यानगर – ०२४१-२३२३८४४

०२२-२२०२७९९०

  • ०२२-२२७९४२२९

०२२-२२०२३०३९

  • ९३२१५८७१४३

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button