Letest News
शिर्डीत गुन्हेगारांचा उच्छाद-मध्यरात्री चाकूसह दहशत – पोलिसांची धडक कारवाई श्रीरामनवमी उत्सवानिमित्त पालखी सोहळ्यांचे जल्लोषात स्वागत-संस्थानची सेवाभावाची परंपरा कायम “भोंदू बाबाच्या कुकर्मांनी महाराष्ट्र हादरला-आता मोठ्या लोकांचे धागेदोरे बाहेर येणार?” – अमोल मिटकरी... किशोरी पेडणेकर यांचा शिर्डीत संतापाचा स्फोट! किशोरी पेडणेकर : “कॅप्टनच्या नावाखालील राक्षस उघड करा!” साईसेवेतील प्रामाणिकपणाचा उज्ज्वल आदर्श! पहारेकरी यांची कर्तव्यनिष्ठा ठरली प्रेरणादायी भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा स्फोट! अटकेपूर्वी शिर्डीत गुप्त बैठक-तीन आयएएस अधिकाऱ्यांवर संशय रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ
अ.नगरशिर्डी

शिर्डीसह राज्यात गुरुवारी रात्री बाराच्या दरम्यान चांगला पाऊस!

शिर्डी (प्रतिनिधी)
शिर्डी व परिसरात गुरुवारी उशिरा रात्री बाराच्या दरम्यान ठिकठिकाणी पाऊस पडला. गेली दोन दिवस ढगाळ वातावरण होते .त्यामुळे थंडी गायब होऊन दमट वातावरण तयार झाले होते. गुरुवारी रात्री उशिरा बारा एकच्या दरम्यान सावळीविहीर परिसरात चांगला पाऊस सुरू झाला. त्यामुळे दिवसभर दमट वातावरण काहीसे हलकेसे झाले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


गेले दोन दिवसा पूर्वी कडाक्याची थंडी पडली होती .मात्र अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले. हवामान खात्यानेही ढगाळ वातावरण व तुरळक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र गुरुवारी रात्री सावळीविहीर परिसरात पाऊस पडला. पावसामुळे काहीसे हलके वातावरण झाले असले तरी हिवाळात पावसाळ्यासारखे वातावरण निर्माण झालेचे दिसून येत होते.

ढगाळ वातावरणामुळे पिकांवरही अनेक रोग पडतात. त्यामुळे शेतकरीही काळजीत पडले आहे. कधी थंडी तर कधी दमट असे वातावरण निर्माण झाल्याने लहान मुले , वृद्धही आजारी पडत आहेत.नगरच्या काही भागांमध्ये गेल्या पाच ते सहा दिवसांपासून ढगाळ वातावरण होते आणि वातावरणातही थंडी गायब होऊन उष्णता वाढली होती. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज पावसाने हजेरी लावली आहे.

पुढील 24 तासांचा अंदाज घ्यायचा झाल्यास राज्याच्या सांगली, सातारा आणि कोल्हापूर या पश्चिम क्षेत्राला वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. इथं पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमध्येही पावसाच्या हलक्या सरींची हजेरी पाहायला मिळेल असं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button