Letest News
पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपट टीमचे श्री साईबाबा समाधी दर्शन शिवमहापुराण कथा –पोलिसांचे नियोजन फळास गर्दीचा फायदा घेणाऱ्या टोळ्यांवर धडक कारवाई-२६ आरोपींना अटक मिश्राला साईबाबांची एलर्जी महाराष्ट्र हि साईंची शिवांची आणि संतांची भूमी साईबाबा हे आमचे देवचं नाहीत... रेखा जरे हत्याकांडात मोठी घटना! — बाळबोठे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर कोपरगाव – करंजी शाळेत दाखले वाटप; नायब तहसीलदार सातपुते यांच्या उपस्थितीत उपक्रमाची प्रशंसा साईभक्त जितेंद्र उमेडी यांनी श्री साईबाबांच्या चरणी तांब्याची छत्री केली अर्पण आजचा दिवस शिर्डीकरांसह संपूर्ण साईभक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि भावनिक —श्री साईबाबा महासमाधी दिन गुन्हे प्रतिबंध आणि पुढील योजना-ऑपरेशन मुस्कान – पार्ट 2 : शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती अभियान निवडणूक आयोग हरिश्चंद्र नाही' उद्धव संतापले -मतदार यादी दुरुस्त करा- नंतरच निवडणुका राज ठाकरे-मतदार ... शिवसेनेच्या (ठाकरे गट) नवीन जिल्हा कार्यकारिणीने संगमनेर तालुक्यात उत्साहाचा नवा संचार
अ.नगरशिर्डी

शिर्डीसह राज्यात गुरुवारी रात्री बाराच्या दरम्यान चांगला पाऊस!

शिर्डी (प्रतिनिधी)
शिर्डी व परिसरात गुरुवारी उशिरा रात्री बाराच्या दरम्यान ठिकठिकाणी पाऊस पडला. गेली दोन दिवस ढगाळ वातावरण होते .त्यामुळे थंडी गायब होऊन दमट वातावरण तयार झाले होते. गुरुवारी रात्री उशिरा बारा एकच्या दरम्यान सावळीविहीर परिसरात चांगला पाऊस सुरू झाला. त्यामुळे दिवसभर दमट वातावरण काहीसे हलकेसे झाले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


गेले दोन दिवसा पूर्वी कडाक्याची थंडी पडली होती .मात्र अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले. हवामान खात्यानेही ढगाळ वातावरण व तुरळक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र गुरुवारी रात्री सावळीविहीर परिसरात पाऊस पडला. पावसामुळे काहीसे हलके वातावरण झाले असले तरी हिवाळात पावसाळ्यासारखे वातावरण निर्माण झालेचे दिसून येत होते.

ढगाळ वातावरणामुळे पिकांवरही अनेक रोग पडतात. त्यामुळे शेतकरीही काळजीत पडले आहे. कधी थंडी तर कधी दमट असे वातावरण निर्माण झाल्याने लहान मुले , वृद्धही आजारी पडत आहेत.नगरच्या काही भागांमध्ये गेल्या पाच ते सहा दिवसांपासून ढगाळ वातावरण होते आणि वातावरणातही थंडी गायब होऊन उष्णता वाढली होती. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज पावसाने हजेरी लावली आहे.

पुढील 24 तासांचा अंदाज घ्यायचा झाल्यास राज्याच्या सांगली, सातारा आणि कोल्हापूर या पश्चिम क्षेत्राला वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. इथं पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमध्येही पावसाच्या हलक्या सरींची हजेरी पाहायला मिळेल असं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button