Letest News
दुसरे लग्न केल्याचा जाब विचारताच पतीकडून पहिल्या पत्नीला मारहाण! गुन्हा दाखल! बलात्कार करून, मुलाने ठोकली धूम! मात्र शिर्डी झाली हकनाक बदनाम साईभक्त महिलांप्रमाणेच आता स्थानिक महिलांच्याही गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची धूम स्टाईल होवू लागल... शिर्डीच्या साई संस्थानमधील लाखो रुपयांच्या अपहाराच्या प्रकरणात याचिकाकर्त्या कुठलीही सक्तीची कारवाई ... शिर्डीत अपहरण करून एकाचा खून! या संदर्भात सात अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात! भरत मोरे यांच्या त्या" वादग्रस्त वक्तव्याचा वकील संघाकडून निषेध ! कोल्हार घोटी महामार्गावर कोकणगाव जवळ ट्रक व ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात! तीन ठार! सहा जण गंभीर जखमी! शिव,शाहु.फुले,आंबेडकर प्रबोधिनी समिती कडून शौकतभाई शेख सह सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान! तर मग साई संस्थान हाजी अब्दुल बाबा समाधी येथील देणगी व देखरेख स्वतःकडे का घेत नाही?--आ. संग्राम जगता... शिर्डीत व्हाइटनरची नशा करणाऱ्या तरुणांची वाढली संख्या! छत्रपती कॉम्प्लेक्स बनला त्यांचा अड्डा! आधार ...
अ.नगरराजकीय

गांधी भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता भट्टाचार्य

अभिजित भट्टाचार्य सध्या एका वेगल्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी महात्मा गांधी हे भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता आहेत, अशा आशयाचं विधान केलं आहे.
अभिजित भट्टाचार्य हे यूट्यबवरील एका पॉडकस्टमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना अभिजित भट्टाचार्य यांनी महात्मा गांधी तसेच भारत आणि पाकिस्तान यावर भाष्य केलं.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

महात्मा गांधी यांच्यापेक्षाही पंचमदा (आर. डी. बर्मन) मोठे होते. पंचमदा हे संगितातील राष्ट्रपिता होते. महात्मा गांधी हे भारतासाठी नव्हे तर पाकिस्तानसाठी राष्ट्रपिता होते. भरत हा देश पहिल्यापासूनच होता. पाकिस्तानची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे चुकून महात्मा गांधी यांनी भारताचे राष्ट्रपिता असल्याचं सांगण्यात येतं, असं अभिजित भट्टाचार्य म्हणाले.

त्यांच्या या विधानानंतर संपूर्ण जग महात्मा गांधी यांच्यापुढे झुकतं ते का? असं विचारण्यात आलं. त्यावर बोलताना आगामी 10 वर्षांनंतर तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न विचारणारही नाहीत, असं उत्तर अभिजित भट्टाचार्य यांनी केलं. अभिजित भट्टाचार्य यांच्या या विधानाचा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अभिजित भट्टाचार्य काही दिवसांपूर्वी एका अनोख्या कारणामुळे चर्चेत आले होते. मुंबईत जगप्रसिद्ध गायक दुआ लिपा हिचा एक लाईव्ह कॉन्सर्ट झाला होता. या लाईव्ह् कॉन्सर्टदरम्यान अभिजित भट्टाचार्य यांच्या गाण्यावर दुआ लिपा चांगलीच थिरकली होती. त्यानंतर अभिजित भट्टाचार्य नव्याने चर्चेत आले होते.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button