Letest News
पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपट टीमचे श्री साईबाबा समाधी दर्शन शिवमहापुराण कथा –पोलिसांचे नियोजन फळास गर्दीचा फायदा घेणाऱ्या टोळ्यांवर धडक कारवाई-२६ आरोपींना अटक मिश्राला साईबाबांची एलर्जी महाराष्ट्र हि साईंची शिवांची आणि संतांची भूमी साईबाबा हे आमचे देवचं नाहीत... रेखा जरे हत्याकांडात मोठी घटना! — बाळबोठे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर कोपरगाव – करंजी शाळेत दाखले वाटप; नायब तहसीलदार सातपुते यांच्या उपस्थितीत उपक्रमाची प्रशंसा साईभक्त जितेंद्र उमेडी यांनी श्री साईबाबांच्या चरणी तांब्याची छत्री केली अर्पण आजचा दिवस शिर्डीकरांसह संपूर्ण साईभक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि भावनिक —श्री साईबाबा महासमाधी दिन गुन्हे प्रतिबंध आणि पुढील योजना-ऑपरेशन मुस्कान – पार्ट 2 : शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती अभियान निवडणूक आयोग हरिश्चंद्र नाही' उद्धव संतापले -मतदार यादी दुरुस्त करा- नंतरच निवडणुका राज ठाकरे-मतदार ... शिवसेनेच्या (ठाकरे गट) नवीन जिल्हा कार्यकारिणीने संगमनेर तालुक्यात उत्साहाचा नवा संचार
अ.नगरशिर्डी

साईबाबांच्या पावलावर पाऊल ठेवत संस्थानाने दिला बेघर व भोजना पासून वंचितांना मदतीचा हात

शिर्डी (प्रतिनिधी) :-
साईबाबांचे संपूर्ण आयुष्य हे सेवाभाव, दानधर्म आणि प्रेमाचा अनमोल संदेश देणारे होते. त्यांनी स्वतः कधीही संपत्ती जमविली नाही, की वैभवाचा मोह केला नाही. उलट त्यांनी भिक्षा मागून आणलेल्या अन्नातून गरिबांना जेवू घातले, बेघरांना आसरा दिला आणि निराधारांना आधार दिला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

साईबाबा नेहमी म्हणत – “अन्नदान हेच श्रेष्ठ दान.” त्यांच्या दृष्टीने भुकेल्याला जेवू घालणे म्हणजेच देवाची खरी सेवा होती. तसेच त्यांनी “सबका मालिक एक” या शिकवणीद्वारे सर्वांना बंधुभाव आणि समतेचा संदेश दिला.

आज त्याच सेवाभावाचा वारसा श्री साईबाबा संस्थान प्रशासन पुढे नेत आहे. शिर्डी आणि परिसरात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक कुटुंबे अडचणीत आली आहेत. काहींच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने सामान नष्ट झाले, तर काहींना राहण्यासाठी सुरक्षित निवाऱ्याचीही सोय उरली नाही.

या परिस्थितीत श्री साईबाबा संस्थान प्रशासनाने पुढाकार घेत गरजूंसाठी आधारवड उभा केला आहे. साई आश्रम क्रमांक दोन येथे नागरिकांसाठी तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. शेकडो नागरिकांना येथे सुरक्षित छत मिळाले असून, त्यांची गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

फक्त निवाऱाच नव्हे तर संस्थान प्रसादालय सर्वांसाठी खुले करून गरमागरम भोजन दिले जात आहे. पावसामुळे अडकलेल्या आणि अन्नाच्या अभावाला सामोरे जाणाऱ्या नागरिकांसाठी ही सेवा म्हणजे खरोखरच देवदूतासमान मदत ठरत आहे.

संस्थान प्रशासनाने आवाहन केले आहे की – “ज्या नागरिकांना अजूनही पावसामुळे गैरसोय भासत आहे, त्यांनी या सुविधांचा अवश्य लाभ घ्यावा. साईसेवा हीच आमची खरी पूजा आहे.”

साईबाबा नेहमी सांगायचे – “जो माझ्यावर श्रद्धा ठेवेल त्याचे मी ओझे वाहीन.” आज त्याच शिकवणीचा प्रत्यय नागरिकांना संस्थानाच्या सेवेमधून येत आहे.

भुकेल्याला अन्न, बेघराला आसरा, निराधाराला आधार आणि दुःखी माणसाला समाधान – हेच साईसेवेचे खरे ध्येय आहे. आज या सेवेमुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. अनेकांचे अश्रू पुसले जात आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू खुलले आहे.

हेच साईंची खरी कृपा आणि त्यांचा वारसा – जो आज संस्थान आपल्या कार्यातून जिवंत ठेवत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button