Letest News
दुसरे लग्न केल्याचा जाब विचारताच पतीकडून पहिल्या पत्नीला मारहाण! गुन्हा दाखल! बलात्कार करून, मुलाने ठोकली धूम! मात्र शिर्डी झाली हकनाक बदनाम साईभक्त महिलांप्रमाणेच आता स्थानिक महिलांच्याही गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची धूम स्टाईल होवू लागल... शिर्डीच्या साई संस्थानमधील लाखो रुपयांच्या अपहाराच्या प्रकरणात याचिकाकर्त्या कुठलीही सक्तीची कारवाई ... शिर्डीत अपहरण करून एकाचा खून! या संदर्भात सात अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात! भरत मोरे यांच्या त्या" वादग्रस्त वक्तव्याचा वकील संघाकडून निषेध ! कोल्हार घोटी महामार्गावर कोकणगाव जवळ ट्रक व ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात! तीन ठार! सहा जण गंभीर जखमी! शिव,शाहु.फुले,आंबेडकर प्रबोधिनी समिती कडून शौकतभाई शेख सह सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान! तर मग साई संस्थान हाजी अब्दुल बाबा समाधी येथील देणगी व देखरेख स्वतःकडे का घेत नाही?--आ. संग्राम जगता... शिर्डीत व्हाइटनरची नशा करणाऱ्या तरुणांची वाढली संख्या! छत्रपती कॉम्प्लेक्स बनला त्यांचा अड्डा! आधार ...
अ.नगरराजकीय

डॉक्टर पंकज आशिया हे नगरचे जिल्हाधिकारी शिर्डी संस्थान वरही त्रिसदस्य समितीत सदस्य राहणार!

शिर्डी (प्रतिनिधी)-
अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारीपदी डॉ.पंकज आशिया यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे.यवतमाळ जिल्हाधिकारी पदावरून त्यांची अ,नगरला बदली झाली आहे. आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानवर सध्या त्रिसदस्यीय समिती कार्यरत असून त्यामध्ये जिल्हाधिकारी हे सदस्य असतात.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

त्यामुळे
अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची बदली होऊन त्यांच्या जागेवर जिल्हाधिकारी म्हणून डॉक्टर पंकज आशिया हे आले आहेत. त्यामुळे ते श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या त्रिसदस्यीय समितीवर सदस्य असणार आहेत.
डॉ. पंकज आशिया हे जोधपूर (राजस्थान) येथील मूळ रहिवासी आहेत.

त्यांचे वडील डॉक्टर तर आई गृहिणी आहे. त्यांनी डॉक्टर व्हावे अशी वडीलांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पदवी घेतली. त्यानंतर यूपीएससीचा अभ्यास सुरू केला. पहिल्याच प्रयत्नामध्ये ते यूपीएससी उत्तीर्ण झाले होते.मात्र त्यांना अपेक्षित असलेली आय.ए.एस.ची रँक मिळाली नव्हती. तिसऱ्या प्रयत्नांत ते आय. ए. एस. झाले.

त्यांनी कोणताही खासगी क्लास न लावता स्वयंम अभ्यास करून हे यश संपादन केले. आशिया हे २०१६ बॅचचे आय. ए. एस. अधिकारी आहेत. देशात ५६ वी रँक त्यांनी मिळविली आहे. त्यांनी मालेगाव (नाशिक) येथे प्रांताधिकारी म्हणून काम करताना शहर कोरोनामुक्त करण्यासाठी राबविलेल्या उपक्रमाचे राज्यभर कौतुक झाले होते.

त्यांच्या कार्याची दखल घेऊन भिवंडी महानगरपालिकेत आयुक्त म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आले होते. जळगाव जिल्हा परिषदेचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही कार्यरत होते तेथे जिल्ह्याच्या ग्रामीण विकासावर त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यानंतर त्यांची यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली.

यवतमाळ येथे जिल्हाधिकारी ते होते. व आता त्यांची बदली यवतमाळ वरून अहिल्यानगर येथे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे. त्यामुळे शिर्डी येथील साई संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या त्रिसदस्यीय समितीवरही ते सदस्य राहणार आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button