Letest News
अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर पथकाची धडक कारवाई-गावठी कट्टा विक्रीसाठी दोन इसमांचा पर्दाफा... राहाता शहरात बदलाची गर्जना-घराणेशाही-भ्रष्ट राजकारणाचा पर्दाफाश – नागरिकांचा रोष उफाळला 55 कोटींचा महाघोटाळा —तेच लोक आज राजकारणात मोठ्या खुर्च्या घेण्यासाठी धाव घेतायत.- लोकांना फसवणारे ह... प्रभाग २ क मध्ये ‘सक्षम प्रभाग – विकसित प्रभाग’चा नवा आवाज किटली चिन्हाचे उमेदवार सतीश उर्फ नंदू गों... अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा बदल : 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या — कोर्टातील अपीलचा परिणाम प्रभाग १ ब मध्ये परीवर्तनाची लाट — अॅड. प्रतिक शेळके अग्रस्थानी ‘बॅट’ चिन्हावर मतदारांचा विश्वास — श... तीन दिवस तळीरामांचे ‘दिवे लागले’ — जिल्हाधिकाऱ्यांचा कोरडा दिवस आदेश जाहीर मतदान मतमोजणी आणि मतदानाप... राहाता नगरपरिषद : “जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना झाडू घेऊन हद्दपार करा!” — रामनाथ सदाफळ (आप) सुनील निवृत्ती पाटील शिंदे यांचा प्रचंड दावा : “प्रभाग २ मध्ये नंदूभाऊंचा विजय ठरलेलाच… विरोधकांची ब... एआय बनावट वन्यप्राणी व्हिडिओवाल्यांना थेट जेल — एसपी सोमनाथ घार्गे यांची कडक सूचना”
अ.नगरराजकीय

संगमनेर तालुक्यात वाईट प्रवृत्ती येऊ देऊ नका- माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात

मंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीने राज्यभर फिरून काम करण्याऐवजी सध्याच्या महसूल मंत्र्यांचे कार्यक्षेत्र कनोली-मनोली- कनकापूर पुरतेच मर्यादित राहिले आहे, अशी टीका मंत्री विखे यांच्यावर करत संगमनेर तालुक्यात वाईट प्रवृत्ती येऊ देऊ नका, असे आवाहन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

थोरात म्हणाले, मंत्रीपदाचा एक मान असतो. आपणही महसूल मंत्री म्हणून सहा वर्ष काम केले. मात्र या कार्यकाळात कधीही कुणाची अडवणूक केली नाही. या उलट सध्याचे महसूल मंत्री सत्तेचा वापर करून सर्वसामान्य माणसाच्या जीवनात मोठ्या अडचणी निर्माण करत आहे.

kamlakar

सध्याचे मंत्री मुरूमाचा ट्रॅक्टर पकडण्यासाठी कोतवालाला फोन करतात, इतकी वाईट अवस्था सध्या निर्माण झाली आहे.संगमनेर तालुक्यातील विकास कामांना त्यांनी घातलेला खोडा येथील जनता विसरणार नाही,

असा आशावाद व्यक्त करत गोरगरिबांच्या अन्नात माती कालविणाऱ्या प्रवृत्ती सर्वांनी एकजुटीने रोखायला हव्या. तालुक्यात बाहेरच्या राज्यातील पदाधिकारी येऊ लागल्याने तालुक्यात त्यांच्या माध्यमातून ढाबा संस्कृती वाढत असून तरुण पिढी बिघडविण्याचे काम सुरू आहे.

हे सर्व रोखतांना त्यांच्यासोबत असलेल्या खबऱ्यांचाही वेळीच बंदोबस्त करण्याचे आवाहन थोरात यांनी केले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button