Letest News
रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा ६०-७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची घरे तोडू नयेत-सातबारा देण्याची मागणी शिर्डीत हरवलेले मोबाईल शोधून देण्यात पोलिसांचे कौतुकास्पद काम
क्राईमशिर्डी

शिर्डीतील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नगरातील रहिवाशांना न्यायालयाचा सात दिवसासाठी जैसे थे चा आदेश!

शिर्डी( प्रतिनिधी) शिर्डी नगर परिषदेच्या वतीने येथील (गावठाण )मधील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरातील रहिवाशांना आपण राहत असलेली घरे निष्काशीमत करावी . अन्यथा नगरपरिषद ती निष्काशीत करेल. म्हणून नोटीस दिली आहे.यावर येथील रहिवाशांनी माननीय न्यायालयामध्ये धाव घेतली असून न्यायालयात सुनावणीहून सात दिवसासाठी जैसे थे चा आदेश दिला आहे. त्यामुळे अण्णाभाऊ साठे नगरातील रहिवाशांना धीर मिळाला आहे. अशी माहिती अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष समीर रामचंद्र वीर यांनी दिली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


शिर्डी मधील अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवाशी अनेक वर्षापासून येथे राहतात. नळपट्टी, घरपट्टी, पाणीपट्टीही भरतात. येथे राहणारे सर्व मागासवर्गीय व गोरगरीब आहेत. मात्र शिर्डी नगर परिषदेने अण्णाभाऊ साठे नगरातील रहिवाशांना राहत असलेल्या जागा खाली कराव्यात. अन्यथा नगरपरिषदेत येथील ही घरे निष्काशीत करेल. अशी लेखी नोटीस दिली आहे. त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये मोठी तारांबळ उडाली असून आता कुठे जायचे असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

त्यामुळे येथील रहिवाशांनी माननीय न्यायालयात धाव घेतली. माननीय न्यायालयाने दावा दाखल करून घेतला व त्यावर सुनावणी झाल्यानंतर शिर्डीतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरातील परिस्थिती सात दिवसासाठी जैसे थे चा आदेश माननीय न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी तरी अण्णाभाऊ साठे नगरातील रहिवाशांना मोठा आधार आला आहे. असे समीर रामचंद्र वीर यांनी सांगितले असून यापुढे आमचा लढा सुरूच राहणार आहे.

न्यायालयावर आमचा विश्वास आहे. तेवढाच विश्वास आमचा विखे कुटुंबावर स्वर्गीय बाळासाहेब विखे नामदार राधाकृष्ण विखे व खासदार संजय दादा विखे विखे परिवाराचं मागासवर्गीय समाजावर अत्यंत प्रेम आहे ते राहणारच म्हणूनच नामदार राधाकृष्ण विखे व खासदार सुजय दादा पाटील यांना एकच विनंती आहे एक तर आमचे पुनर्वसन करा, नाहीतर आम्हाला आहे तेथेच राहू द्या, अशी मागणीही अण्णाभाऊ साठे नगरातील सर्व रहिवाशांच्या वतीने आम्ही करत आहोत. असेही त्यांनी सांगितले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button