Letest News
दुसरे लग्न केल्याचा जाब विचारताच पतीकडून पहिल्या पत्नीला मारहाण! गुन्हा दाखल! बलात्कार करून, मुलाने ठोकली धूम! मात्र शिर्डी झाली हकनाक बदनाम साईभक्त महिलांप्रमाणेच आता स्थानिक महिलांच्याही गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची धूम स्टाईल होवू लागल... शिर्डीच्या साई संस्थानमधील लाखो रुपयांच्या अपहाराच्या प्रकरणात याचिकाकर्त्या कुठलीही सक्तीची कारवाई ... शिर्डीत अपहरण करून एकाचा खून! या संदर्भात सात अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात! भरत मोरे यांच्या त्या" वादग्रस्त वक्तव्याचा वकील संघाकडून निषेध ! कोल्हार घोटी महामार्गावर कोकणगाव जवळ ट्रक व ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात! तीन ठार! सहा जण गंभीर जखमी! शिव,शाहु.फुले,आंबेडकर प्रबोधिनी समिती कडून शौकतभाई शेख सह सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान! तर मग साई संस्थान हाजी अब्दुल बाबा समाधी येथील देणगी व देखरेख स्वतःकडे का घेत नाही?--आ. संग्राम जगता... शिर्डीत व्हाइटनरची नशा करणाऱ्या तरुणांची वाढली संख्या! छत्रपती कॉम्प्लेक्स बनला त्यांचा अड्डा! आधार ...
क्राईमशिर्डी

शिर्डीतील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नगरातील रहिवाशांना न्यायालयाचा सात दिवसासाठी जैसे थे चा आदेश!

शिर्डी( प्रतिनिधी) शिर्डी नगर परिषदेच्या वतीने येथील (गावठाण )मधील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरातील रहिवाशांना आपण राहत असलेली घरे निष्काशीमत करावी . अन्यथा नगरपरिषद ती निष्काशीत करेल. म्हणून नोटीस दिली आहे.यावर येथील रहिवाशांनी माननीय न्यायालयामध्ये धाव घेतली असून न्यायालयात सुनावणीहून सात दिवसासाठी जैसे थे चा आदेश दिला आहे. त्यामुळे अण्णाभाऊ साठे नगरातील रहिवाशांना धीर मिळाला आहे. अशी माहिती अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष समीर रामचंद्र वीर यांनी दिली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


शिर्डी मधील अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवाशी अनेक वर्षापासून येथे राहतात. नळपट्टी, घरपट्टी, पाणीपट्टीही भरतात. येथे राहणारे सर्व मागासवर्गीय व गोरगरीब आहेत. मात्र शिर्डी नगर परिषदेने अण्णाभाऊ साठे नगरातील रहिवाशांना राहत असलेल्या जागा खाली कराव्यात. अन्यथा नगरपरिषदेत येथील ही घरे निष्काशीत करेल. अशी लेखी नोटीस दिली आहे. त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये मोठी तारांबळ उडाली असून आता कुठे जायचे असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

त्यामुळे येथील रहिवाशांनी माननीय न्यायालयात धाव घेतली. माननीय न्यायालयाने दावा दाखल करून घेतला व त्यावर सुनावणी झाल्यानंतर शिर्डीतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरातील परिस्थिती सात दिवसासाठी जैसे थे चा आदेश माननीय न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी तरी अण्णाभाऊ साठे नगरातील रहिवाशांना मोठा आधार आला आहे. असे समीर रामचंद्र वीर यांनी सांगितले असून यापुढे आमचा लढा सुरूच राहणार आहे.

न्यायालयावर आमचा विश्वास आहे. तेवढाच विश्वास आमचा विखे कुटुंबावर स्वर्गीय बाळासाहेब विखे नामदार राधाकृष्ण विखे व खासदार संजय दादा विखे विखे परिवाराचं मागासवर्गीय समाजावर अत्यंत प्रेम आहे ते राहणारच म्हणूनच नामदार राधाकृष्ण विखे व खासदार सुजय दादा पाटील यांना एकच विनंती आहे एक तर आमचे पुनर्वसन करा, नाहीतर आम्हाला आहे तेथेच राहू द्या, अशी मागणीही अण्णाभाऊ साठे नगरातील सर्व रहिवाशांच्या वतीने आम्ही करत आहोत. असेही त्यांनी सांगितले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button