Letest News
‘विखेंनी साईबाबांच्या चरणी हात ठेवून सांगावे!’ – नगर–मनमाड रस्त्यावर निलेश लंके यांचा थेट हल्ला साईबाबांच्या दर्शनाला आलेल्या भाविकांवर डल्ला! शिर्डीत चैनस्नॅचिंग करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद-स्थ... १५० रुपयांच्या तंबाखूवर धाडसी कारवाई, पण शिर्डी राहात्यात कोट्यवधींच्या गुटखा तस्करीला अभय! शिर्डीत दलालगिरीला लगाम! भाविकांची अडवणूक करणाऱ्यांवर कलम १५२ चा चाबूक बंद दरवाजामागचं गूढ उघडलं- शिर्डीत हॉटेल कामगाराचा गळफास-कारण अद्याप गुलदस्त्यात झिरो टॉलरन्सचा बडगा! शिर्डीतील २ गुन्हेगारांसह ३२ सराईत आरोपींवर तडीपार प्रस्ताव नियम पाळा-नाहीतर कारवाई! शिर्डीत रिक्षाचालकांना पोलीस निरीक्षक महेश येसेकरांचा इशारा दुःखातून सेवेकडे… साईबाबा संस्थानच्या आवाहनाला प्रतिसाद-नेत्रदानातून अनेकांना नवी दृष्टी शिर्डी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी-देशभरातील ७ राज्यांत शोधमोहीम-हरवलेले ५० महागडे मोबाइल शोधून मूळ ... श्रद्धेचे सुवर्ण अर्पण-येथील साईभक्त आरती बिहानी यांचे ११.९९ लाखांचे सोन्याचे ब्रोच श्री साईचरणी अर्...
क्राईमशिर्डी

शिर्डीतील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नगरातील रहिवाशांना न्यायालयाचा सात दिवसासाठी जैसे थे चा आदेश!

शिर्डी( प्रतिनिधी) शिर्डी नगर परिषदेच्या वतीने येथील (गावठाण )मधील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरातील रहिवाशांना आपण राहत असलेली घरे निष्काशीमत करावी . अन्यथा नगरपरिषद ती निष्काशीत करेल. म्हणून नोटीस दिली आहे.यावर येथील रहिवाशांनी माननीय न्यायालयामध्ये धाव घेतली असून न्यायालयात सुनावणीहून सात दिवसासाठी जैसे थे चा आदेश दिला आहे. त्यामुळे अण्णाभाऊ साठे नगरातील रहिवाशांना धीर मिळाला आहे. अशी माहिती अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष समीर रामचंद्र वीर यांनी दिली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


शिर्डी मधील अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवाशी अनेक वर्षापासून येथे राहतात. नळपट्टी, घरपट्टी, पाणीपट्टीही भरतात. येथे राहणारे सर्व मागासवर्गीय व गोरगरीब आहेत. मात्र शिर्डी नगर परिषदेने अण्णाभाऊ साठे नगरातील रहिवाशांना राहत असलेल्या जागा खाली कराव्यात. अन्यथा नगरपरिषदेत येथील ही घरे निष्काशीत करेल. अशी लेखी नोटीस दिली आहे. त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये मोठी तारांबळ उडाली असून आता कुठे जायचे असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

त्यामुळे येथील रहिवाशांनी माननीय न्यायालयात धाव घेतली. माननीय न्यायालयाने दावा दाखल करून घेतला व त्यावर सुनावणी झाल्यानंतर शिर्डीतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरातील परिस्थिती सात दिवसासाठी जैसे थे चा आदेश माननीय न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी तरी अण्णाभाऊ साठे नगरातील रहिवाशांना मोठा आधार आला आहे. असे समीर रामचंद्र वीर यांनी सांगितले असून यापुढे आमचा लढा सुरूच राहणार आहे.

न्यायालयावर आमचा विश्वास आहे. तेवढाच विश्वास आमचा विखे कुटुंबावर स्वर्गीय बाळासाहेब विखे नामदार राधाकृष्ण विखे व खासदार संजय दादा विखे विखे परिवाराचं मागासवर्गीय समाजावर अत्यंत प्रेम आहे ते राहणारच म्हणूनच नामदार राधाकृष्ण विखे व खासदार सुजय दादा पाटील यांना एकच विनंती आहे एक तर आमचे पुनर्वसन करा, नाहीतर आम्हाला आहे तेथेच राहू द्या, अशी मागणीही अण्णाभाऊ साठे नगरातील सर्व रहिवाशांच्या वतीने आम्ही करत आहोत. असेही त्यांनी सांगितले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button