Letest News
श्री साई निर्माण शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी अनोख्या उपक्रमातून साजरी केली ' रक्षाबंधन ' भाजपाचे माजी जिल्हा पदाधिकारी बंडू शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा महिला विनयभंगाचा गंभीर गुन्हा दाखल मुख्यमंत्री सहाय्यता निधी अनेक रुग्णांसाठी ठरला आशेचा किरण ! लाभार्थी रुग्णांनी व्यक्त केल्या कृतज्ञ... नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे अहिल्यानगर येथे उत्साहात स्वागत ! रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल येथे कै पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांची 125 जयंती व शे... शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांची बदली त्याच्या जागी अमोल भारती यांची वर्णी साईसेवेच्या कार्यात उल्लेखनीय योगदान करणाऱ्या साईभक्त रघु सुंदरम यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीन... शिर्डी दुहेरी हत्याकांडातील आरोपींविरुध्द मकोका कायदयान्वये कारवाई नगर मनमाड रोडवरील हॉटेल मध्ये खंडणीसाठी गुंड्यांचा हैदोस  शिर्डीचे ग्राम महसूल अधिकारी सतीश गायके यांची गच्ची धरून धक्काबुकी करीत चोरीचा मुरुमाचा डंफ़र तस्करा...
अ.नगरराजकीय

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेवुन या गरीब लोकांना शासकीय जागेत घरकुल बांधुन देवुन न्याय द्यावा अशी मागणी करणार भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा

शिर्डी येथे निमगाव शिवारातील देशमुख चारी लगत राहणा-या गोरगरीब जनतेची घरे काढल्याने तेथील कुटुंबाचे संसार उघड्यावर आले असुन त्यांचे डोक्यावरील छप्पर गेल्याने संतापाची भावना निर्माण झाली आहे. याबाबत आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेवुन या गरीब लोकांना शासकीय जागेत घरकुल बांधुन देवुन न्याय द्यावा अशी मागणी करणार आहोत. सदरहु ठिकाणी राहात्याच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.ममता पिपाडा व भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी संबंधीत कुटुंबांना भेट देवुन त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


यावेळी डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी बोलताना सांगितले की वास्तविक याठिकाणी आवश्यकता नसताना अतिक्रमणाच्या नावाखाली घरे काढण्यात आलेले असल्याचे प्रथम दर्शनी दिसुन येते. 400 हुन अधिक कुटुंब गेल्या 60-70 वर्षापासुन त्या ठिकाणी वास्तव्यास होते. ते त्याठिकाणचे कायमचे रहिवाशी झालेले होते. काहीच्या दोन-दोन पिढ्या त्याठिकाणी गेल्या असल्याचे तेथील रहिवाशांनी सांगितले.

अतिक्रमण निघाले त्याठिकाणी जावुन माहिती घेतली असता तेथील रहिवासांचा इरिगेशनची चारी असेल,रस्ता असेल किंवा इतर कुठल्याही वाहतुकीस अडथळा होत नसताना कारवाई झाल्याचे समजले. नगराध्यक्षा सौ.ममता पिपाडा या भेटी साठी व आपले दुख जाणुन घेण्यासाठी आलेल्या पाहुन तेथील महिलांचा अश्रुंचा बांध फुटला व सौ.ममता पिपाड़ा पिपाडा यांच्या गळ्यात पडुन आपल्या दुख:द भावना व्यक्त केल्या.

तेथील महिलांच्या यातना व घरे भुईसपाट केलेले दृष्य पाहुन काळीज हेलावुन गेले. तेथील प्रत्येक कुटुंबाची एक वेगळीच व्यथा होती. कोणाच्या घरी दोन दिवसाची बाळंतीन महिला होती तर कोणाच्या घरात आजारपणाने खाटावर झोपलेले वृद्ध होते. अशातच बुलडोजर येईल व आपली घरे उद्धवस्त करुन जाईल असे कोणाला स्वप्नातही वाटले नव्हते. तेथील प्रत्येक कुटुंब हे शासनाला घरपट्टी ,पाणीपट्टी,लाईटबील असे कर भरत होते,

प्रत्येक घराला मिळकत नंबर होता. काहींनी शासकीय योजनेचा लाभ घेवुन घरे बांधली होती. साईबांच्या शिर्डीत जावुन दोन वेळची भाकरीची व्यवस्था होईल यासाठी मेहनत करायचे. घरे पडलेली असतानाही उघड्यावर चार भांड्यांचा संसार मांडुन पोटाची खळगी भरण्यासाठी भर उन्हात स्वयंपाक करत असलेली महिलेच्या डोळ्यात अश्रुंचे थैमान सुरु होते. आज या विस्थापित झालेल्या कुटुंबांना कोणी वाली राहीलेला नाही अशी अवस्था झाली आहे.


पुढे बोलताना डॉ.राजेंद्र पिपाडा म्हणाले की या सर्व बेघर झालेल्या कुटुंबांच्या व्यथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेवुन या गरीब लोकांना शासकीय जागेत घरकुल बांधुन देवुन न्याय द्यावा अशी मागणी करणार आहोत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button