Letest News
अबब! साई संस्थान हादरले — संस्थानमधील ४७ कर्मचाऱ्यांनी साईबाबांच्या झोडीत हात घातला”“शेवटी साईबाबांच... पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपट टीमचे श्री साईबाबा समाधी दर्शन शिवमहापुराण कथा –पोलिसांचे नियोजन फळास गर्दीचा फायदा घेणाऱ्या टोळ्यांवर धडक कारवाई-२६ आरोपींना अटक मिश्राला साईबाबांची एलर्जी महाराष्ट्र हि साईंची शिवांची आणि संतांची भूमी साईबाबा हे आमचे देवचं नाहीत... रेखा जरे हत्याकांडात मोठी घटना! — बाळबोठे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर कोपरगाव – करंजी शाळेत दाखले वाटप; नायब तहसीलदार सातपुते यांच्या उपस्थितीत उपक्रमाची प्रशंसा साईभक्त जितेंद्र उमेडी यांनी श्री साईबाबांच्या चरणी तांब्याची छत्री केली अर्पण आजचा दिवस शिर्डीकरांसह संपूर्ण साईभक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि भावनिक —श्री साईबाबा महासमाधी दिन गुन्हे प्रतिबंध आणि पुढील योजना-ऑपरेशन मुस्कान – पार्ट 2 : शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती अभियान निवडणूक आयोग हरिश्चंद्र नाही' उद्धव संतापले -मतदार यादी दुरुस्त करा- नंतरच निवडणुका राज ठाकरे-मतदार ...
क्राईमशिर्डी

त्या दीड कोटीच्या लाचेत धाकराव सह तत्कालीन पोलीस निरीक्षक दिनेश आहेर वर तात्काळ कारवाई व्हावी

स्थानिक गुन्हे शाखेने माझ्याकडून लाच म्हणून घेतलेले दिड कोटी रुपये परत द्यावे, अशी मागणी भूपेंद्र सावळेने राहाता न्यायालयात केली. त्याच्या वकीलांनी थेट पोलीस आयुक्तांकडे अर्ज दाखल केल्याने ग्रोमोर घोटाळ्यातील खटल्यात खळबळ उडाली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

पोलिसांच्या कारवाईतून वाचवण्यासाठी लाचखोर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस तुषार धाकराव याच्यासह पाच पोलिसांनी लाचेपोटी स्वीकारलेले दिड कोटी रुपये परत मिळावे यासाठी भूपेंद्रचे वकील बी. ए. हुसळे यांनी नाशिक विभागीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे रितसर अर्ज दाखल केला आहे.

ग्रोमोर घोटाळ्यातील प्रमुख आरोपी भूपेंद्र राजाराम सावळे याला नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने अडवून आम्हाला दिड कोटी रुपये दे नाही तर तुझ्यावर गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकतो असे धमकावल्याने सावळेने तुषार धाकराव यांच्या पथकाला दिड कोटी रुपयांची लाच दिली होती.

याचा भांडाभोड भूपेंद्रला अटक झाल्यानंतर त्त्याने केला होता. सदर घटना अकार्यक्षम पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या काळात घडली होती. त्यानंतर ओला यांच्या जागी आलेले सोमनाथ घार्गे यांनी पोलीस खात्याची बदनामी होऊ नये म्हणून तुषार धाकराव याच्यासह पाच पोलीस निलंबीत केले होते.

पोलिसांचे निलंबन झाले असले तरी दिड कोटी कुणाच्या खिशात गेले? त्या दिड कोटीचे लाभार्थी कोण? हे प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. ह्या प्रकरणी दैनिक साईदर्शनाने राज्याचे पोलीस महासंचालक सह संबंधित विभागांना अर्ज केला होता कि आहिल्यानगरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनाही दोषी धरून तात्काळ निलंबित करून त्यावर देखील बडतर्फेची कारवाई व्हावी असे लेखी अर्ज दिले आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button