Letest News
दुसरे लग्न केल्याचा जाब विचारताच पतीकडून पहिल्या पत्नीला मारहाण! गुन्हा दाखल! बलात्कार करून, मुलाने ठोकली धूम! मात्र शिर्डी झाली हकनाक बदनाम साईभक्त महिलांप्रमाणेच आता स्थानिक महिलांच्याही गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची धूम स्टाईल होवू लागल... शिर्डीच्या साई संस्थानमधील लाखो रुपयांच्या अपहाराच्या प्रकरणात याचिकाकर्त्या कुठलीही सक्तीची कारवाई ... शिर्डीत अपहरण करून एकाचा खून! या संदर्भात सात अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात! भरत मोरे यांच्या त्या" वादग्रस्त वक्तव्याचा वकील संघाकडून निषेध ! कोल्हार घोटी महामार्गावर कोकणगाव जवळ ट्रक व ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात! तीन ठार! सहा जण गंभीर जखमी! शिव,शाहु.फुले,आंबेडकर प्रबोधिनी समिती कडून शौकतभाई शेख सह सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान! तर मग साई संस्थान हाजी अब्दुल बाबा समाधी येथील देणगी व देखरेख स्वतःकडे का घेत नाही?--आ. संग्राम जगता... शिर्डीत व्हाइटनरची नशा करणाऱ्या तरुणांची वाढली संख्या! छत्रपती कॉम्प्लेक्स बनला त्यांचा अड्डा! आधार ...
अ.नगरराजकीय

बांधावरून मारहाण,आरोपींना तीन वर्षांची शिक्षा

कोपरगाव तालुक्यातील कारवाडी येथील शेतीचा बांध कोरल्याच्या कारणावरून तीन जणांना लोखंडी पाईपने केलेल्या हाणामारीत तीन जण जखमी झाले होते यात आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने यातील आरोपी व्यंकटेश सोमनाथ वलटे,सोमनाथ सीताराम वलटे मीना सोमनाथ वलटे आदी तीन जणांना कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी भगवान पंडित यांनी ०३ वर्षांची शिक्षा प्रत्येकी ०५ हजारांचा दंड ठोठावला आहे.त्यामुळे असामाजिक तत्वांना असे गंभीर गुन्हे करताना चारवेळा विचार करावा लागणार असल्याची प्रतिक्रिया सामाजिक वर्तुळातून उमटली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी दत्तात्रय आबासाहेब वलटे आणि आरोपी सोमनाथ सीताराम वलटे हे चुलते पुतणे आहे.त्यांच्यात शेतीच्या बांधावरून वाद आहेत.दरम्यान फिर्यादी दातत्रय वलटे हे आपले वडील आबासाहेब वलटे आई सिंधुताई वलटे आदी दिनांक ०९ जुलै २०२० रोजी सायंकाळी ०७ वाजेच्या सुमारास घरासमोर उभे असताना त्या ठिकाणी आरोपी व्यंकटेश सोमनाथ वलटे,

सोमनाथ सीताराम वलटे मीना सोमनाथ वलटे आदी तीन जण आले व फिर्यादी व त्याचे घरातील अन्य सदस्यांना म्हणू लागले की,”तुम्ही आमच्या शेतीचा बांध का कोरला ?” असा जाब साल करून आरोपी सोमनाथ वलटे यांनी आपल्या हातातील लाकडी दांडा फिर्यादीची आई सिंधूबाई वलटे हिच्या डोक्यात मारला होता.व्यंकटेश वलटे याने आपल्या हातातील लोखंडी पाईपने फिर्यादीच्या वडिलांच्या डोक्यात प्रहार केला केला होता.

त्यात ते गंभीर जखमी झाले होते.त्यांना सोडविण्यासाठी फिर्यादी मुलगा गेला असता त्यांनी त्यांनाही मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली होती.त्यात दोघं जण जखमी झाले होते.त्यानंतर त्यांनी मीना वलटे हिलाही पाईपने मारहाण केली होती.फिर्यादी आणि त्यांचे आई वडील गंभीर जखमी झाल्यावर आरोपी घटनास्थळावरून निघून गेले होते.त्यानंतर जखमींना लोणी येथील रुग्णालयात उपचारार्थ भरती केले होते.

दरम्यान या प्रकरणी फिर्यादी दत्तात्रय वलटे याने कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रं.३२७/२०२० भा.द.वी.कलम ३२६,३२५,३२४,३२३,५०४,५०६,३४(१) प्रमाणे पोलिस अधिकाऱ्यांनी तपास पूर्ण करून आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला होता.

सदर गुन्हा कोपरगाव येथील अतिरिक्त न्यायदंडाधिकारी यांचेसंमोर सुनावणी साठी दाखल झाला होता.या प्रकरणाची नुकतीच सुनावणी पूर्ण झाली होती त्यात सरकारी वकील प्रदीप रणधीर यांनी फिर्यादीचे वतीने जोरदार बाजू मांडली होती तत्यात न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य न्या.भगवान पंडित यांनी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून आरोपी व्यंकटेश सोमनाथ वलटे,सोमनाथ सीताराम वलटे मीना सोमनाथ वलटे आदी तीन जणांना दोषी धरून ०३ वर्षाची शिक्षा व प्रत्येकी ०५ हजारांचा दंड ठोठावला आहे.त्यामुळे या निकालाचे कारवाडी आणि परिसरात स्वागत होत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button