Letest News
शिर्डीत भक्तिरसाचा महापर्व! साई–हरी नामाचा सार्वजनिक कीर्तन सोहळा ५०व्या वर्षात — शिर्डी पंढरपूरमय मतदानाच्या दिवशी शिर्डी आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय-मतदान प्रक्रियेला अडथळे टाळण्यासाठी प्रशासन... प्रचाराचा शेवटचा दिवस…आणि शिर्डीतले वातावरण अक्षरश धगधगतंय! कारण या निवडणुकीत एकच नाव वाऱ्यासारखं पस... अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर पथकाची धडक कारवाई-गावठी कट्टा विक्रीसाठी दोन इसमांचा पर्दाफा... राहाता शहरात बदलाची गर्जना-घराणेशाही-भ्रष्ट राजकारणाचा पर्दाफाश – नागरिकांचा रोष उफाळला 55 कोटींचा महाघोटाळा —तेच लोक आज राजकारणात मोठ्या खुर्च्या घेण्यासाठी धाव घेतायत.- लोकांना फसवणारे ह... प्रभाग २ क मध्ये ‘सक्षम प्रभाग – विकसित प्रभाग’चा नवा आवाज किटली चिन्हाचे उमेदवार सतीश उर्फ नंदू गों... अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा बदल : 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या — कोर्टातील अपीलचा परिणाम प्रभाग १ ब मध्ये परीवर्तनाची लाट — अॅड. प्रतिक शेळके अग्रस्थानी ‘बॅट’ चिन्हावर मतदारांचा विश्वास — श... तीन दिवस तळीरामांचे ‘दिवे लागले’ — जिल्हाधिकाऱ्यांचा कोरडा दिवस आदेश जाहीर मतदान मतमोजणी आणि मतदानाप...
अ.नगरराजकीय

डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी पावसामुळे प्रभावित भागांची केली तपासणी, नागरिकांना सावधगिरीचा सल्ला

शिर्डी (प्रतिनिधी) :-
काल झालेल्या मुसळधार पावसामुळे शिर्डी व राहाता परिसरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक शेतजमिनी, रस्ते, ओढा-नाल्या यांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांसाठी तात्काळ पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करून केली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

आज डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी परिसरातील प्रभावित भागांची सविस्तर पहाणी केली. राहाता शिर्डी व परिसरातील ओढा-नाल्यांची पाहणी करत त्यांनी अत्यंत मुसळधार पावसामुळे नागरिकांना होणाऱ्या अडचणींचा अंदाज घेतला. यावेळी शिवाजी आनप, अनिलभाऊ पिपाडा, नेमीचंद लोढा, महावीर पिपाडा आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

डॉ. पिपाडा यांनी राहाता शहरील छत्रपती व्यापारी संकुल, राहाता साकुरीला जोडणारा पूल, रांजणगाव रोड साई कॉलनी आणि राष्ट्रीय महामार्गलगत शिरकांडे ओढा येथे पाहणी करून परिस्थितीची नोंद घेतली. त्यांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि सुरक्षित राहण्याचे आवाहन केले.

डॉ. राजेंद्र पिपाडा हे राहाता तालुक्यासाठी नेहमीच लढा देणारे व्यक्तिमत्व आहेत. सर्वांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे, नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे काम करणारे, हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे.

पावसामुळे प्रभावित नागरिकांच्या मदतीसाठी त्यांनी तत्परतेने प्रशासनाशी संपर्क साधला आणि तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न केले.

स्थानिक नागरिकांनीही या सेवेला उच्च प्रतिसाद दिला असून, प्रशासनाकडे मदतीसाठी संपर्क साधला आहे. अनेकांचे घर पावसाने नुकसान झाले, रस्ते वाहून गेले, तर शेतजमिनी पाण्यात बुडाल्या आहेत. यामुळे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची गरज अधोरेखित होत आहे. डॉ. राजेंद्र पिपाडा

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button